आजच्या धकाधकीच्या जीवनात परिवर्तन नियमाप्रमाणे होत आहे. याबरोबर माणुसकीही बदलत आहे. मी २०११ ला पत्रकारिता आणि संज्ञापन च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असतांना आम्ही सुसंवाद नावाने अनियतकालिक प्रसिद्ध केले होते. त्यात 'गणेशोत्सव विशेषांक' हा माझा विषय होता. त्यामध्ये मी लिहिलेले संपादकीय आजही तीन वर्षानंतरही तंतोतंत लागू होते. आणि "परिवर्तन हा संसारचा नियम आहे" यावर विश्वासच बसत नाही. यासाठी मुद्दामून ते पान या पोस्टसोबत देत आहे. त्यामध्ये गणरायाला केलेली प्रार्थना या गणेशोत्सवातही करावीशी वाटते.
सोबतच माझ्या मित्रांने दिलेले लेखही जोडले आहेतच.
तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!!
No comments:
Post a Comment