नमस्कार, भरपूर दिवसांपासून लिहायचे ठरवतोय पण
वेळ काही निघत नाही. म्हटले एकत्रित लिहूया, घडलेल्या काही रोचक आणि मनोवेधक गोष्टी.
शनिवारी
संध्याकाळी ऑफिस सुटले आणि मी गावाकडे जाण्यास निघालो. वेळेत रेल्वे मिळाली पण
जागा नेहमीप्रमाणे छीन्के घ्यावी लागली, नंतर तो सहप्रवासी गावाकडचा निघाला.
प्रवासातील गम्मत आणि त्यातून मिळणारे सदबोध याचा प्रत्यय मला या प्रवासात आला.
गाडी
सुरु होण्याच्या काही क्षणापूर्वी एक तरुण गर्दीला सावरत आमच्या जागेजवळ आला आणि
म्हणाला, "मला पण जागा द्या भाऊ, गावाकडची माणूस आपण तर !" हे शब्द
ऐकताच त्याला जागा दिली. येथून सुरु झाली माझी खरी गोष्ट. त्या तरुणाचे भारतीय
सेनेतील महार - बटालियन मध्ये सिलेक्शन होणार होते. त्याची तो परीक्षाही देऊन आला
होता. त्याच्या बोलक्या स्वभावाने आमच्या जवळील सर्व प्रवाश्यांना आपलेसे केले.
त्याचे एक एक वाक्य हे देशप्रेमाने आणि मी कसा आपल्या देशासाठी कामास येऊ शकतो, यासाठी आणि यानेच भरलेले होते. तो
सांगत होता. आपल्या खेड्यातील मुले , आदिवासी मुले थोडी जरी जास्त मेहनत
करतील तर देशासाठी नक्कीच कामी येतील. आमच्या पाचोरा, भडगाव, तसेच खानदेशातील भरपूर मुले यासाठी
मेहनत घेतात. हे ही तो छातीठोकपणे सांगत होता.
या
सर्व गोष्टी एकूण मला क्षणभर वाटले, आपण एवढे शिकूनही जे नाही बोलण्याची
हिम्मत करू शकत ती हिम्मत हा खानदेशी जवान करतोय. याचे अप्रूप वाटले. या
सर्वांमध्ये आमच्यासोबत दोन महाराष्ट्र बाहेरील तरुण होते की जे त्यांच्या गावी
जात होते, त्यांना सुद्धा या तरुणाने शब्द मोहिनी टाकली.
त्यातील एक 12 वी चे शिक्षण घेत असलेल्या मुलाला तर त्याने चक्क कौन्सलिंगच देऊ
केली.
त्याला आपली स्वतःची सर्व कागदपत्रे दाखवून सैन्यात जाण्यासाठी काय काय
करावे, कोणते
कागदपत्रे, कोणाकडून तयार करावी याचेही मार्गदर्शन केले.
त्याची ही धडपड केवळ देशासाठी आणि फक्त देशासाठी. हे पाहून मला खूप बरे वाटले.
भारतात विविधतेत एकता मी वाचली आणि बोलली होती, पण पहिली पहिल्यांदा !
खरच
त्या तरुणाने माझ्या मनावर मोहिनी टाकली होती. त्या तरुणाचे नाव मनोज, कदाचित हा प्रसंग मी ब्लॉगवर
टाकण्याच्या काळात तो त्याच्या पोस्टिंगवर गेलाही असेल.
असो, पण यावरून हेच सिद्ध होते अजूनही
भारतात खरे मातृभक्त आणि जवान आहेत. त्याचबरोबर विविधतेत एकता आहे.
जय
हिंद !!
For more info Please visit :- http://indiannavy.nic.in/