Wednesday, 23 July 2014

पावसाचे आगमन झाले आणि मनात काही शब्द आले !!




पावसाचा शिडकावा झाला मन प्रसन्न झाले,
चिंतीत शेतकरीचे काळीज भरून आले,
पाड पांडुरंगा पाऊस धो-धो तोही गारवा देणारा,
आम्हा धनधान्य आणि देशास समृद्धीकडे नेणारा,

हरी म्हना करी पावसाले सुरवात,
देई मनशांती अन बळीराजाले साथ,
पाणीसाठी वण-वण कश्यासाठीरे तू करी,
पावसानं पाणी ले तू घागर मा भरी,

हाउ संदेश ध्यानमा ठेवजो रे भाऊ,
मी-बी करसु तू-बी कर पाण्यानी बचत,
यान्हावरच राहीन उभी उदयानी इमारत….
पुन्हा भेटसुत.
-
गोपाल अनिलकुमार पालीवाल

No comments:

Post a Comment